बंद

    सांडपाणी व्यवस्थापन

    भांडी घासणे धुणे व अंघोळीसाठी वापरलेले पाणी वाहून जाते हेच पाणी घराशेजारी वाहत जाते. आणि एका ठिकाणी साचले जाते. या साचलेल्या सांडपाण्यामुळे डबके निर्माण होऊन दुर्गंधी येते, यामुळे साथरोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सांडपाणी व्यवस्थापन महत्वाचे आहे. कुटूंब स्तरीय व सार्वजनिक स्तरीय शोषखड्डा/ मॅजीक पीट/ पाझर खड्डा, 5000 लोकसंख्येकरिताच्या गावांसाठी स्थिरीकरण तळे, डिवॅटस, नाल्या गटारे व 5000 पेक्षा जास्त लोकसंख्येकरीताच्या गावांसाठी क्लोज्ड ड्रेन, स्मॉल बोअर, सार्वजनिक शोषखड्डे, स्थिरीकरण तळे, कन्स्ट्रक्टेड वेटलँड्स, डिवॅटस, फायटोराईड, एअरेशन ऑफ बीग पॉंड, नाल्या/गटारे इ. कामे सांडपाणी व्यवस्थापना अंतर्गत केली जातात.

    प्रत्येक महसूल गावातील 5000 पर्यत लोकसंख्येच्या गावात सांडपाणी व्यवस्थापनासाठी प्रती व्यक्ती 280/- रूपये तसेच 5000 पेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावात सांडपाणी व्यवस्थापनासाठी प्रती व्यक्ती 660 रूपये इतकी रक्कम सांडपाणी व्यवस्थापनाकरिता अनुज्ञेय आहे. शासन निर्णय 21 नोव्हेंबर 2021 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार कामाची 30 टक्के रक्कम ग्रामपंचायतीने 15 व्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या अनुदानातून खर्च करण्याची तरतूद आहे. तर 70 टक्के रक्कम स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा- 2 या योजनेतून दिली जाते.