जिल्हातील अपंग पशुपालकांना स्वयंरोजगाराची आवड निर्माण करणे व पशुपालकाचे उत्पन्न वाढवणे. शेळीगट (10+1 ) शासनाने विहित केलेले रक्कम रु.६८,000/- आहे. जिल्हा परिषद ९०% अनुदान रु. ६१२००/- निर्धारित आहे. शेळीगट (10+1 ) चा विमा व वाहतूक खर्च लाभार्थीने स्वता करावयाचा आहे.
आपत्कालीन परिस्थितीत दगावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना अर्थसहाय्य करणे
नैसर्गिक व आपात्कालीन परिस्थितीमध्ये उदा. पूर /अतिवृष्टी/ वीज कोसळून /डोंगरदरीत पडून जनावर मृत / वाडा कोसळून अथवा जळून जनावर सर्पदंश / विष बाधेने / रेबीज आजार / गंभीर आजाराने अचानक मरण पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना तात्काळ अर्थसहाय्य करणे हा योजनेचा उद्देश आहे.