मानवाच्या रोजच्या विविध कृतीतून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांना घनकचरा म्हणतात. जर आपण योग्य पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली तर हेच टाकाऊ पदार्थ उर्जेचा एक मोल्यवान स्त्रोत होऊ शकतो. मानवी समाजात घनकचराही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने गंभीर बाब आहे. कुटूंबस्तरीय व सार्वजनिक स्तरीय कचरा कुंड्या, कंपोस्ट पिट, कचरा वाहून नेण्यासाठी ट्रायसायकल/बॅटरी ऑपरेटेड ट्रायसायकल, प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाकरीता ग्रामस्तरीय साठवण युनिट, मासिक पाळी व्यवस्थापन युनिट हि कामे घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत केली जातात.
प्रत्येक महसूल गावातील 5000 पर्यत लोकसंख्येच्या गावात घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रती व्यक्ती 60 रूपये तसेच 5000 पेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावात घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रती व्यक्ती 45 रूपये इतकी रक्कम घनकचरा व्यवस्थापनाकरिता अनुज्ञेय आहे. शासन निर्णय 21 नोव्हेंबर 2021 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार कामाची 30 टक्के रक्कम ग्रामपंचायतीने 15 व्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या अनुदानातून खर्च करण्याची तरतूद आहे. तर 70 टक्के रक्कम स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा 2 या योजनेतून दिली जाते.