- भारत निर्माण कार्यक्रमातील नॅशनल गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत सर्व पंचायत राज संस्थाचे संगणकीकरण करुन त्यांच्या कारभारात एक सुत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी ईपीआरआय/ईपंचायत हा मिशन मोड प्रकल्प हाती घेणेत आलेला आहे.
- महाराष्ट्रातील सर्व पंचायत राज संस्थांचे जिल्हा परिषद , पंचायत समिती , ग्रामपंचायत (संगणकीकरण करुन त्यांचा कारभार ऑनलाईन करण्याचा महत्वकांक्षी संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) ई-ग्राम सॉफ्ट हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
- प्रकल्प अंमलबजावणी करीता CSC-SPV या कंपनीची नेमणुक करणेत आलेली आहे.
- महाराष्ट्रात हा प्रकल्प आपले सरकार सेवा केंद्र या नावाने राबविण्यात येत आहे.
आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पाची उद्दिष्टये
- सर्व पंचायत राज संस्थांचा कारभार ऑनलाईन करणे .
- सर्व पंचायत राज संस्थांचा कोष (Database) तयार करणे.
- ई- पंचायत सुटमधील ११ आज्ञावली मध्ये माहिती भरणे.
- ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत G2G व G2C सुविधा पोहचविणे.
- या प्रकल्पाच्या समन्वायाने नागरिकांना ग्रामीण भागात देण्यात येणा-या सर्व सुविधांचा दर्जा उंचविणे ..